भांडा सौख्यभरे...भांडलंच पाहिजे...
आरोग्यासाठी भांडण आवश्यक आहे. पूर्वी लोक नळावर, बसमध्ये,ऑफिसमध्ये, शाळे मध्ये,घरात,,दारात भांडत असायची..राग आला, पटलं नाही की तिथल्या तिथे हिशेब क्लीअर करून मिटवला जायचा..
त्यामुळे मनातला राग ,द्वेष पटकन डी फ्युज होऊन मनातला वणवा विझून जायचा आणि मन मोकळं होवून जायचं..
आज काय होतंय की भांडण आपण मॅनर्सलेसच्या वर्गात टाकून दिलंय. मनात राग आणि द्वेष असला तरी तो व्यक्त न करता वरवरचा शांत हसरेपणा आपण स्वीकारालाय..मी भांडलो किंवा भांडले तर माझी प्रतिमा लोकांत कशी होईल याचीच काळजी लागून राहाते..आपली शांत सुस्वभावी एटिकेट्स वाली प्रतिमा ही फेक असते.आतून आपण रागाने ,द्वेषाने, मत्सराने बेभान झालेले असतो . हा डबल स्टॅंडर्ड घातक असतो मनालाही आणि शरीरालाही..आपल्यातले हे "दोन" वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतात.
एक तर बोलून मोकळं झालं पाहिजे अथवा मोकळं होऊन बोललं पाहिजे..जे पटत नाही ते बोलून मोकळं व्हायचं ,उदाहरण..मैत्रिणीची साडी आवडली नाही तर आवडली नाही अस सांगावं उगाचच छान आहे वगैरे खोटं खोटं बोलू नये..किंवा काही बोलूच नये..साडी छान नाहीये हे तुमचं अंतर्मन सांगतंय पण मैत्रिणीला वाईट वाटेल (मुळात यात वाईट वाटण्यासारखं काही नाही) म्हणून तुमचं बहिर्मन साडी छान म्हणतंय म्हणजे तुमच्या दोन मनात संघर्ष होतोय.. त्यामुळे मन अस्थिर होतय ,मन एकदा अस्थिर झालं की ते रोगांना आमंत्रण देतंय..
याचा दुसरा इफेक्ट असा आहे की तुम्ही तुमच्या मैत्रीणीला वास्तवापासून लांब नेताय.तिला कल्पनेत रमवताय..म्हणजे जे नाही ते आहे असे समजणे यातूनच स्वतःची, स्वतःसाठी तयार केलेली फेक प्रतिमा तयार होते.हे सुद्धा घातकच..
उलट्या बाजूने विचार केला तर जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणी ला तिची साडी सुंदर आहे अस खोटं खोट सांगता तेव्हा ती देखील तुमची साडी किती सुंदर आहे ग ,केवढ्याला घेतली? कुठे घेतली असे खोट्या उत्सुकतेने सांगते तेव्हा ती देखील तुम्हाला कल्पनेच्या खोट्या विश्वात नेत असते..
पुरुषांच्या बाबतीत पण असेच होत असते.पण विषय वेगळे असतात..मूळ मुद्दा असा आहे की आपण जसे दिसते,जसे जाणवते तसे व्यक्त व्हायला विसरलोय.. लाभ आणि हानीची गणिते डोक्यात ठेवून आपण रिलेशनशिप डेव्हलप करतोय.न जाणो भविष्यात हा माणूस उपयोगी पडेल मग याला का दुखवा..असा प्रोफेशनल विचार करतो आपण..त्यालाच आपण मॅनर्स समजून चाललोय. त्याचे भले बुरे परिणाम आपण भोगतोय..
भांडण हा सेफ्टी व्हॉल्व आहे..मनात कोंडलेली वाफ निघून जाण्यासाठी.. म्हणून जे मित्र आपल्याशी भांडतात ते सच्चे असण्याची शक्यता जास्त असते..
म्हणून भांडल पाहीजे,
आभाळ मोकळं झालं पाहिजे
उगाच ढगांची गर्दी कशाला
बरसून मोकळं झालं पाहिजे..
©- प्रशांत 😊