बाजार...
बाजारात उभा होतो...
अनेक माणसं आणि प्राणी ये जा करत होती..एक गाढव आलं ..त्याने कचरा कुंडी शोधली ..ते तिकडे रमले..चार पाच कुत्री त्याना हवं ते हुंगत इकडे तिकडे फिरत होती..बाजूला फळांचा स्टॉल लागला होता.. छान ताजी फळं बकेट भरून लावली होती..कुत्रा आणि गाढव यांचे तिकडे लक्ष जाणे शक्यच नव्हते...मुळात ते त्यांचे नैसर्गिक खाणेच नाही ना..
बाजारात एक चिकन सेंटर होते.. शुद्ध शाकाहारी माणस तिकडे फिरकत पण नव्हती..आणि मांसाहारी माणसं भाजीवाल्याकडे पाहत पण नव्हती..
बाजारात प्रत्येक धर्माचे एकेक स्थळ होत मंदिर . त्या त्या धर्माचे धार्मिक लोक त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळावर जात येत होते..ईश्वर एक असला तरी माणसांनी त्यांची विभागणी केल्या मुळे ते एकमेकांच्या धार्मिक स्थळी जाणे शक्यच नव्हते...प्रत्येकाचा देव मोठा...
बाजारात एक मोर्चा सुद्धा चालला होता.. मोर्चातले लोक घोषणा देत होते.. कडेने चालणाऱ्या लोकांना त्यांचे काही सोयर सुतक नव्हते..कारण त्यांच्यावर अन्याय झाला नव्हता..आणि मोर्चातल्या लोकांना ते सोडून बाकीचे सगळे शोषक वाटत होते..
बाजारात सर्व काही होत..आंबट ,तिखट,तुरट,गोड ,कडू सगळ्या चवी होत्या त्या बाजाराला..जो तो आपल्याला आवडेल ती चव चाखून पहात होता....आणि त्याच चवीचा बाजार आहे असे डिक्लेअर करत होता..
.......😊 सोशल मीडिया हा एक प्रकारचा बाजारच आहे..जो तो आपल्याला रुचेल आवडेल आणि बोचेल ते घेतो आणि तेच आपआपल्या ग्रुपवर पोस्ट करत असतो..
..... जग आपल्या आपल्या चवीनुसार असतं...आंबट,तिखट, गोड ,कडू,तिखट,खारट...
......झापडं काढून टाकली की बाजार स्वच्छ दिसतो...
😊-प्रशांत
No comments:
Post a Comment