Ad

Saturday, 23 December 2023

बोधिसत्व कथा /#६

बोधिसत्व कथा /#६

एकदा एका विद्वानाने संबोधी ..ध्यान प्राप्त करण्यासाठी   खूप सारे ग्रंथ घेतले आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर जाळून टाकले.

*********************

💡- ग्रंथ हे ज्ञान मिळवण्याचे साधन आहे संग्रह करण्याचे साध्य नाही. पूर्वसूरींनी त्यांचे ज्ञान शब्दबध्द केले आणि आपल्या पर्यंत पोहोचवले आपण ते शब्दबद्ध ज्ञान शब्दातून मुक्त करून अनुभूती पर्यंत नेले पाहिजे..
      प्रत्यक्षात तसे होत नाही आपण शब्दात अडकतो,त्याच्या प्रेमात पडतो ते मुखोद्गत करतो पण अनुभूतीत परावर्तित होत नाही. ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार तेहतीस ओव्यांपैकी एक तरी ओवी अनुभवावी असे का म्हटले गेले असेल.? 
     हरिपाठाची पारायणे होतात,कीर्तने होतात ,प्रवचने होतात. ऐकून ऐकून सर्व तोंड पाठ होते. सर्व तोंडपाठ झाले म्हणजे ज्ञान झाले का? 
   आपल्या पूर्वीच्या शिक्षणपद्धतीत घोकायची आणि ओकायची सवय होती.कविता ,श्लोक तोंडपाठ करायचे आणि न अडखळता म्हणून दाखवले की झाला हुषार विद्यार्थी.. कविता किंवा श्लोक किती समजला याला काही महत्वच  नव्हतं...
      शाळेत असताना  नागरिक शास्त्र विषय असतो ,त्याची परीक्षा होते  आपण पास होतो.पण पुढच्या आयुष्यात त्याचा किती उपयोग करतो ? 
      आपण केवळ परिक्षार्थी झालोय ,खरंतर विद्यार्थी असणे हे सुद्धा पुरेसे नाही.विद्या मिळवणे ही पहिली पायरी त्या विद्येचा उपयोग ज्ञान मिळवण्यासाठी जेव्हा होतो तेव्हा तो ज्ञानार्थी होतो.विद्या हे कौशल्य आहे आणि ज्ञान ही अनुभूती आहे. लाकडाच्या तुकड्यापासून खुर्ची बनवणे हे स्किल किंवा कौशल्य आहे पण ती खुर्ची तयार झाल्यावर पाहणे तीत बसणे, तिला स्पर्श करणे हे ज्ञान आहे..
     ज्ञान झाल्यावर ग्रंथांची गरज उरत नाही उलट त्यांचा संग्रह अहंकारात रूपांतरित होण्याची शक्यता जास्तच....

अत्त दीप भव 🙏🏻

☺️- प्रशांत

No comments:

Post a Comment

तीची डायरी

... तो गेल्यावर... तिची काळजी घेणारे खूपच.. घरातल्यापेक्षा बाहेरचेच जास्त.. घरात ती ओझे झालेली... तरी एक बरं आहे.. ती आहे स्वतःच्या पायावर उ...