Ad

Sunday, 24 December 2023

बोधिसत्व कथा?#८

बोधिसत्व कथा?#८ 

एकदा एक शिष्य बोधिसत्वाकडे येऊन म्हणाला की ,मला ध्यान जमत नाही, काय करू?
बोधिसत्व म्हणाले , " हे निघून जाईल "
      काही दिवसांनी तो शिष्य परत आला आणि आनंदांने म्हणाला, गुरुजी आता ध्यान उत्तम जमतंय..
     बोधिसत्व म्हणाले," हे निघून जाईल".

***********************

💡- बोधिसत्वाच्या कथांमध्ये एक गूढ अर्थ असतो वरवर वाचून तो समजत नाही. सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन टोकांमध्ये विचारांचा लोलक फिरत असतो. आयुष्यात केवळ सकारात्मक गोष्टी घडतील किंवा केवळ नकारात्मक घटना घडतील असे नसते ,दोन्ही ठिकाणी सम बुद्धी म्हणजे स्वीकारात्मकता.
     ध्यानाच्या उच्च पातळीत कायम रहाणे सामान्य माणसाला शक्य नसते. जसे सुखाची अवस्था कायम रहात नाही. जत्रेतील पाळणा जसा वर जातो उच्च पातळीवर पोहीचतो तिथून परत खाली येतो ..पुन्हा वर जातो तसेच साधना करताना आणि आयुष्य जगताना सुद्धा होत असते..बोधिसत्वाना त्या शिष्याला सांगायचे आहे की ध्यान जमले तरी आनंद नको आणि नाही जमलं तरी दुःख नको या दोन्ही अवस्था स्वीकार ,साक्षी भावाने आयुष्याकडे बघ..
     विशेष म्हणजे भगवद्गीता पण हेच सांगते तू कर्म करत रहा बाकी सगळं माझ्यावर सोपव..भगवान श्रीकृष्ण पण स्वीकारात्मक व्हा असे त्यांच्या जीवना जगण्याच्या पद्धतीने सांगतात.त्यानी गोकुळवासीयांचे प्रेम ही स्वीकारले आणि महाभारताच्या युद्धानंतर गांधारीचा वंशक्षयाचा शापही स्वीकारला..
     अल्बर्ट एलिस यांचे माईंडफुलनेस हेच सांगते की प्रत्येक क्षण जगा, तो जसा आहे तसा स्वीकारा.
     शाश्वत तत्वज्ञान नष्ट होत नाही मुळगाभा तोच ठेऊन प्रत्येक  कालखंडात ते रूप बदलून येते..
    अत्त दीप भव...

😊-प्रशांत

No comments:

Post a Comment

देव भोळा

देवभोळा..😃 देवाला जो मानत नाही  तो असतो नास्तिक.. माझी गोष्ट जरा वेगळीच  वेगळी नशा वेगळी किक  मी मानतो देवाला  पण देव मला मानत नाही कधी गेल...