Ad

Wednesday, 2 July 2025

अनय

अनय..

लोक करतात राधे राधे 
पण त्या अनयच काय 
दुःख त्याचे मूक अनावर 
कोण लक्षात घेत काय?

सात फेरे आणि आहुती 
त्यानेही दिली असेलना
सुखी संसाराची स्वप्ने 
त्यानेही पाहिली असतील ना 

शरीर इकडे आत्मा तिकडे 
अवघा प्रपंच झाला कलेवर 
निळाईत बायको रमली 
कुणाला ना त्याचा गहिवर

अशी कशी नियती चुकली 
व्यर्थच झाले सात फेरे 
भांगेत सिंदूर भरताना 
राधेचा का हात थरथरे?

इतिहासाच्या पानावरती 
अनयची त्या नोंद कुठे?
असेल त्याचेही प्रेम तिच्यावर 
पण तिलाही ते कळले कुठे?

मिळून सारे सरून गेले 
गंगेकाठी तृषार्त अनय 
मनातला मनातच राहिला 
गोकुळात एकाचा प्रणय 

-प्रशांत 
 8600583846

Tuesday, 1 July 2025

माया

माणूस का निर्माण झाला असावा? सखोल विचार केला तर माणूस हा निसर्गाचा भाग असूनही तो निसर्गाला जाणून घेतो म्हणजे स्वतःलाच जाणून घेतो.. हे बाह्य विश्व अनंत आहे त्याहूनही आतले विश्व अफाट आणि अथांग आहे तरीही ते समजत असल्याचा दावा विज्ञानवादी करतात आणि ते पुर्ण समजल्याचा दावा अध्यात्मवादी करतात.. खरं तर दोघेही आपल्या आपल्या समजुतीत असतात.. दोघांच्याही निष्कर्षांच्या निकषाचा पाया सत्य आहे हे त्यानी गृहीत धरलेले असते.  अनुभूती हा निकष दोघांमध्ये सारखा असला ती घेण्याचे मार्ग भिन्न असतात.. आणि अनुभूतीला  देह आणि मन याची मर्यादा असते.. म्हणून माया हे सत्य असू शकते आणि सत्य ही माया असू शकते 

-प्रशांत

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...