Ad

Friday, 17 January 2025

वाचाल तर "वाचाल" ??की बहकाल???

वाचाल तर "वाचाल" ??की बहकाल???

पुस्तक हे लेखकाचे आकलन असते,
लेखकाचे आकलन हे देश -काल-परिस्थिती नुसार असते. पुस्तक आवडत म्हणजे नेमकं काय होत? अनेक कारणे असतात,कधी विषय आणि आशय आवडतो, कधी लेखनशैली आवडते, कधीकधी आधीच मनात असलेल्या भूमिकेला पाठबळ मिळते,जगताना आलेल्या कटू -गोड अनुभवाशी जुळणारे धागे त्या पुस्तकात आढळतात ..कधी कधी त्या लेखकाने लिहिलेली अगोदरची पुस्तके प्रचंड आवडलेली असतात त्या प्रभावात त्याचे नवीन पुस्तकसुद्धा आवडून जातात.
    व्यवस्थेचा लाभ घेणारे आणि व्यवस्थेचा त्रास होणार असे दोन वर्ग जगातल्या कुठल्याही देशात, प्रांतात असतातच.त्यामुळे व्यवस्थेच समर्थन करणारी आणि व्यवस्थेशी द्रोह करणारी अभिवाक्ती लेखनाद्वारे होत असते आणि त्याचे मग ध्रुवीकरण होणे अपरिहार्य असतेच. एकदा का हे गट पडले की विवेक मागे पडतो. हे आपले ,ते त्यांचे अशी विभागणी होत जाते.आणि मग कोणत्याही घटनेवर पूर्वग्रह ठेवून व्यक्त होवून जातो आपण..
   एखादा लेखक जेव्हा व्यवस्थेच्या बाजूने लिहितो तेव्हा त्याने व्यवस्थेची पॉझिटिव्ह बाजू पाहिलेली असते आणि ती बरोबर असते पण फक्त तीच बरोबर नसते.ती फक्त एक बाजू असते, जेव्हा एखादा लेखक व्यवस्थेच्या विरोधात लिहितो तेव्हा त्याने त्या व्यवस्थेची निगेटिव्ह बाजू पाहिलेली असते आणि ती देखील बरोबरच असते पण ती देखील एक बाजू असते.त्यामुळे दोन्ही बाजूचे वाचन केले तरच व्यवस्थेचा अंदाज येतो 
    पण तसे होत नाही, उमलत्या वयात भूमिका तयार होत जातात त्याला अनुकूल असेच वाचन होत जाते. त्यातूनच समाजाचे अनेक ध्रुवात ध्रुवीकरण होत जाते. समाज म्हणजे एक बृहद वर्तुळ असेल तर त्यात स्वतःचे वेगळे केंद्र स्थान असलेली अनेक वर्तुळे आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचे परीघ अधिक ताठर आणि बुलंद होत जातं आहेत. याला जबाबदार एकांगी लेखन करणारे लेखक आणि त्याला समर्थन करणारे सोशल मीडिया यात डिजिटल आणि प्रिंट दोन्ही मीडिया जबाबदार आहेतच..आणि स्वतन्त्र विचार करू न देणारी सिस्टीम सुद्धा आहे..

- प्रशांत शेलटकर
   8600583846

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...