Ad

Thursday 17 February 2022

वाचाल तर वाचाल?

@परशा.कॉम

वाचाल तर वाचाल???

थोर लोकांनी  स्वतः लिहिलेली पुस्तक वाचावीत. इतरांनी त्यांचे विषयी लिहिलेली पुस्तक वाचताना डोळ्यात तेल घालून आणि मेंदू ताळ्यावर ठेवून वाचावीत.. शेवटी इतरांचे लेखन म्हणजे त्यांचे त्या थोर माणसा विषयीचे आकलन असते . बहुतेक वेळी प्रभावी लेखनशैली ,आपल्या मनात असलेले पूर्वग्रह यामुळे त्या लेखकाच्या विचाराने प्रभावात जाण्याची शक्यता असते.
     धार्मिक ग्रंथ सोडले तर इतर ग्रंथ ही श्रद्धेने वाचायची गोष्टच नव्हे.तटस्थपणे वाचणे, ऐकणे,बोलणे ही कला आहे ती साध्य होण्यासाठी साधना करावी लागते.
      अनुवाद वाचताना तर फार दक्षता घ्यावी लागते ..दर्जेदार अनुवादक दुर्मिळ असतात. जे अनुवादा विषयी तेच प्राचीन भाषेविषयी उदा. संस्कृत.
      हजारो वर्ष अस्तित्वात असलेल्या या भाषेतील एखाद्या शब्दाचा प्राचीन अर्थ आणि वर्तमानातील अर्थ यामध्ये खूप तफावत असते ,उदाहरण म्हणजे धेनु या शब्दाचा प्राचीन अर्थ यज्ञवेदी असा आहे आत्ताचा अर्थ गाय असा आहे...
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी.......
या श्लोकात पंचकन्या की पंचकंना या बद्दल वाद चालू आहे काहींचे म्हणणे असे आहे की या सर्व विवाहित आहेत मग त्याना कन्या का म्हणायचे? त्या पाचजणी आहेत म्हणून मूळ शब्द पंचक असा आहे..असाही एक मतप्रवाह आहे . अहल्या हा शब्द अहिल्या असा वापरला जातो तो अहल्या असा आहे . हल म्हणजे नांगर ...न नांगरलेल्या भूमीला अहल्या म्हणतात.. प्राचीन भाषेविषयी असे कॉन्फ्लिक्ट होतातच . 
     एखादा लेखक आवडतो म्हणजे त्याचे लेखन आपल्याला आवडते . त्याचे लेखन आवडते म्हणजे तो आपल्या बौद्धिक गरजा पूर्ण करतो म्हणून त्याचे लेखन आपल्याला आवडते. 
     आता बौद्धिक गरज म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर व्यक्ती परत्वे बदलते.एखादे पुस्तक वाचून आपले पूर्वग्रह कुरवाळले जातात की आपले लॉजिक धारदार होते या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात..
    वाचन करावे , पण वैश्विक सत्य गवसल्याचा आव आणू नये बस्स इतकंच ...

     -प्रशांत शशिकांत शेलटकर
     8600583846

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...