Ad

Sunday 23 June 2024

मनातलं-#४

मनातलं -# -4

स्वसंवेद्य..

सखोल विचार केला तर आपण जिवंत आहोत म्हणजे मानवी मेंदूच्या मर्यादेत राहून केलेले आकलन आहे. सगळ्या जीवंत माणसांनी जिवंत असण्याचे निकष तयार केले आहेत त्या निकषात बसणे म्हणजे जिवंत अन्यथा मृत..
    समोर जे काही दिसतं त्याची सतत जाणीव किंवा अनुभूती किंवा त्याचे आकलन होत रहाणे म्हणजे जिवंत असणे. सगळ्या जाणिवा मेंदूशी निगडित असतात. त्यामुळे जे दिसते ते तसेच आहे आणि तेच वास्तव आहे हे माणसाच्या उत्क्रांत होत गेलेल्या मेंदूने ठरवले आहे.
    बिग बँग झाले पण का झाले? जीव का निर्माण झाले आणि मुळात  मानव निर्माण का झाला? निसर्गाचाच भाग असलेला माणूस निसर्गाचेच तटस्थ निरीक्षण कसे करेल?
    बिग बँग पूर्वी काहीच नव्हते तर काहीच निर्माण व्हायला नको.ज्ञानेश्वरीत एक अर्थपूर्ण शब्द आहे ... " स्वसंवेद्य" म्हणजे स्वतःला जाणून घेण्यासाठी स्वतःच स्वतःला निर्माण केलेले..बिग बँग पूर्वी काहीच नव्हते तर असे काय द्रव्य होते की ज्याला स्वतःलाच जाणून घ्यायचे होते म्हणून स्वतःच स्वतःला निर्माण केले..बरं हे सर्व जंजाळ समजून घ्यायला ,त्याची मांडणी करायला माणूस निर्माण झाला? की जो त्या द्रव्याचाच एक भाग आहे..
    ही एक प्रकारची वैचारिक लुपच आहे, सेम इनपुट सेम आउटपुट..जो पर्यंत त्याचा उलगडा होत नाही ( तसही तो कधीच होणार नाही) तो पर्यंत आपण जिवंत आहोत हे गृहीत धरायला हरकत नाही ज्यादिवशी या लुपच्या बाहेर जाऊ तो मृत्यू असेल..मृत्यू म्हणजे आस्तित्वाचा अभाव ही मांडणी वैज्ञानिक आहे.पण विज्ञान ही एक कापूस कोंड्याची गोष्ट आहे.प्रश्नांची उत्तरे आणि उत्तरातून प्रश्न.. 
    तात्पर्य-जाणून घेणे म्हणजे जाणून घेण्याची मर्यादा समजण्याची जाणीव होणे...

© प्रशांत-शेलटकर
       86 00 58 38 46

No comments:

Post a Comment

कोकनी..

कोकनी...😊 मी नाय भक्त आनी मी नाय चमचा खावन पिवन सुखी  भात आनी लोनचा हैसून येता पाकीट थैसून येता पाकीट टोपी खय कोनास ठाव उरला फक्त जाकीट हैस...