Ad

Wednesday, 24 January 2024

एक मीरा ...एक राधा..

मेरे तो गिरीधर गोपाल... दुसरो न कोय...

     राधा आणि मीरा दोघींमध्ये एक साम्य होत..दोघी केवळ नाममात्र विवाहित होत्या त्यांचे सर्वस्व कृष्ण होता पण तो पूर्णार्थाने त्यांचा कधी झालाच नाही..
     पण राधे पेक्षा मिरेचे प्रेम जास्त तरल आणि श्रेष्ठ..राधेला कृष्णाचा पार्थिव सहवास तरी होता..पण मीरा आणि राधा यांच्यात युगांचे अंतर होते..मिरेला कृष्ण कधीच पार्थिव रुपात भेटणार नव्हता..तरी मीरा त्याच्यावर उत्कट प्रेम करत राहिली..प्रसंगी विषाचा प्याला प्राशन केला तिने...जो कधीच मिळणार नाही त्याच्यावर उत्कट प्रेम करत रहाणे सर्वाना जमत नाही...ज्यांना जमत त्या राधा किंवा मीरा होतात....

स्वार्थ पूर्ण झाला की ब्रेकपची कारणे शोधणाऱ्या आजच्या तथाकथित प्रेमाच्या कल्पनेच्या बाहेर आहे मीरा.."काहीतरी" मिळवण्याच्या उद्देशाने केलेले प्रेम..ते "काहीतरी" मिळाले की संपून जाते..किंवा नाहीच मिळाले तरी संपून जाते...पाण्याने भरलेला प्याला ओठाला लावला की तृषा शमते.. पण त्याच पाण्यात आकंठ बुडालो तर तृषा आणि तृषार्त दोघेही एकमेकांत विलीन होतात..मीरा आणि राधा कृष्णमय झाल्या त्या याच कारणाने...

- प्रशांत शेलटकर.... "शांतप्रज्ञ"

- 8600583846

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...