Ad

Monday, 11 January 2021

ओझे

ओझे


कधी कधी चढते मला
अध्यात्माची धुंदी
बसतो पाडत वेळोवेळी
शब्दांचीच बुंदी

दिवस रात्र तोंडात माझ्या
हरी हरी आणि हरी
सुटत नाही तिळमात्रही
मोह माया जरी

कित्येक ग्रंथ वाचले अन
कित्येक केली पारायणे
जप तप असंख्य केले
अन असंख्य तीर्थाटने..

तरी न झाले मन हे शांत
झाली ना चित्तशुद्धी
नुसतेच झाले कर्मकांड
अजून ना स्थिरबुद्धि

वाचून वाचून पोपट झालो
करतो शब्दांचे खेळ
अनुभूती तर कसलीच नाही
कशाचा कशाला ना मेळ

शब्दांची वाजवतो पुंगी
गर्दीचा मग नाग डोलतो
वाटते येड्या लोकांना
याच्या तोंडून देव बोलतो

अध्यात्माचे ओझे आता
फेकून देईन म्हणतो
चार चौघांसारखे साधे सरळ
जगून घेईन म्हणतो


-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...