Ad

Tuesday, 28 July 2020

भास-आभास

सुखापेक्षा सुखाच्या व्याख्याच 
करतो माणूस...
प्रत्यक्षापेक्षा भासातच रमतो
किती हा माणूस...

खिडकीतूनच पाहतो तो
धो धो किती पाऊस
भिजण्याचे क्षण का
हरवतो माणूस....

दंश काट्याचे का
लक्षात ठेवतो माणूस
स्पर्श मखमली फुलांचे
का विसरतो माणूस...

का वाटते हाच
आता अंतिम श्वास ?
का उडून जावा
जागण्यावरील विश्वास?

-/प्रशांत

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...