Ad

Tuesday 28 July 2020

भास-आभास

सुखापेक्षा सुखाच्या व्याख्याच 
करतो माणूस...
प्रत्यक्षापेक्षा भासातच रमतो
किती हा माणूस...

खिडकीतूनच पाहतो तो
धो धो किती पाऊस
भिजण्याचे क्षण का
हरवतो माणूस....

दंश काट्याचे का
लक्षात ठेवतो माणूस
स्पर्श मखमली फुलांचे
का विसरतो माणूस...

का वाटते हाच
आता अंतिम श्वास ?
का उडून जावा
जागण्यावरील विश्वास?

-/प्रशांत

No comments:

Post a Comment

नियती..

नियती.... आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो....