Ad

Thursday, 29 March 2018

येड्या मित्रास

खरंच किती रम्य होत ते बालपण......
जेव्हा आपण फक्त
मित्र असायचो....
सुखात एकत्र हसायचो
दुःखात एकत्र रडायचो

कधी पडलो खेळताना
तर अश्रू तेच असायचे
बहुजनांचे खारट आणि
अभिजनाचे गोड ....
असे कधी नसायचे...

आता मात्र सार बदललं
जिवाभावाच्या मित्रामागे
जातीच लेबल लागलं...
कोण झाला सवर्ण,
अन कोण झाला दलित
विषारी नागांच्या फुत्काराचे
विषारीच फलित....

काल पर्यंत होतो आपण
मिळून सारे जण....
आता मात्र आहोत आपण
कोणी बहुजन कोणी अभिजन

कालपर्यंत आपले होते
रक्त लाल आणि लाल फक्त
आज  भगवे ,निळे ,हिरवे
आपण फक्त रंगांचेच भक्त

कसली भगवद्गीता अन
कसली रे मनुस्मृती...
त्रिपिटक कधी वाचलेच नाही
फक्त वाचली माणुसजाती

इतिहासाची उकरून मढी
त्यावर चालते दुकानदारी...
जय हो करीत आम्ही करू
फुकटचीच दुनियादारी...

कधी समजणार भावा तुला
खेळ आपल्याच नेत्यांचा
रंगपंचमी खेळून रक्ताची
येड्या चुना लावती तुला...

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment

कविता..

कविता.. शिट्ट्या आणि टाळ्यांसाठी...  ती  नसते उभी कधीच स्टेज वर... मला आत्मभान देत , जागं करणारी  असते माझी कविता.. नेणिवेत ती असतेच सतत तरं...