रेडी टू एक्सप्रेस...
रेडी टू इट ...दो मिनीट म्यागी सारख्या इन्स्टंट जमान्यात आपलं मत व्यक्त करायला आताशा अभ्यास आणि व्यासंगाची गरज नाही..पूर्वी दहा शब्द लिहायची झाल्यास किमान एक पुस्तक वाचायला लागायचं , आता सोशल मीडियावर आपल्याला हव्या त्या माहितीचे तुकडे उपलब्ध असतात..ते उचलायचे आणि रेसिपीला जसे वेगवेगळे मसाले वापरतात तसे वापरायचे ..कोणत्याही ऐतिहासिक व्यक्ती विषयी माहिती घेताना त्यांनी लिहीलेली आणि त्यांच्याविषयी लिहिलेली सगळी पुस्तक वाचली पाहिजेत त्यातून ती व्यक्ती उलगडत जाते. त्यांचा उलट सुलट प्रवास समजत जातो. त्यांचे काळाच्या कसोटीवर योग्य ठरलेले आणि अयोग्य ठरलेले निर्णय समजून घेता येतात.मुळात हे सगळं शांतपणे..हळूहळू पक्के करत ,तपासून घेत समजून घेता येत.महत्वाचे म्हणजे त्या व्यक्तीला माणूस म्हणून समजून घेता येते. फ्रेम मध्ये लटकवणे आणि फासावर लटकवणे ही दोन टोके टाळता येतात.
आज आपण सोशल मीडियावर तुकड्या तुकड्याने समजून घेत आहोत.. त्यात सलगता नसते. पोस्ट करणारे सोयीनुसार तुकडे टाकत असतात, काही ग्रुप तर एक तर पॉझिटिव्ह किंवा निगेटीव्ह पोस्ट टाकत बसतात.त्यामुळे ग्रुप जॉईन करणे म्हणजे स्वतःचा ब्रेनवॉश करून घेणे होय अस चालू आहे सध्या.....प्रवास करताना जेवण तयार आहे असे बोर्ड दिसतात..तसे सोशल मीडियावर माहिती तयार आहे चे अदृश्य बोर्ड आहेत .त्यातून "चुलीवरच्या माहितीला "खूप मागणी आहे. रूढ असलेल्या महितीपेक्षा काहीतरी वेगळं वाचलं की ते मनाला आकर्षित करते..
ही एक प्रकारची नशा आहे.तुम्ही कोणत्या पध्दतीने विचार करायचा आणि कोणत्या पध्दतीने व्यक्त व्हायचे हे हल्ली सोशलमीडिया ठरवतो.अर्थात माहितीचा स्फोट होणे हे चांगलेच असते. त्यामुळे परस्परविरोध समजतो. प्रिंट मीडियाला मर्यादा असतात आणि तो नियंत्रित होतो किंवा केला गेला जाऊ शकतो.पण सोशल मीडिया हा माहितीचा धबधबा आहे. फक्त त्या धबधब्यात आपली सद्सद्विवेक बुद्धी,स्वतन्त्र विचार शक्ती आणि माणुसकी वाहून जाता नये इतकंच..पुढे ए आय आहे ..त्यामुळे धोका अजून गडद आहे..
- प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment