Ad

Saturday, 8 March 2025

तुमचं असं कधी होतं का?

तुमचं असं कधी होतं का?

एका बैठकीत दोनशे पानी पुस्तक वाचून संपवावे म्हणून तुम्ही बैठक मारता आणि चार पाच पान वाचून झाली की अस वाटत की अरे यार बाकीची काम कधी करणार ?  खूप दिवस झाले हार्मोनियम वाजवली नाही..वरचेवर हात बसला नाही तर खराब होईल ती...अरे इस्त्री करायची राहून गेलीय..कपाट लावायचं राहून गेलंय.. मग पुन्हा चार पाच पान वाचून झाली की ऑफिस आठवतं.. तिथली पेंडींग काम आठवतात..मार्च एन्ड जवळ आलाय आपली काहीच तयारी नाही..पुढची चार पान वाचताना लक्षच लागत नाही..व्हाटसप वर काय मेसेज आले असतील..म्हणून पाच मिनिटं बघू आणि ठेवू असा विचार करून व्हाटसप बघतो.. त्यात चॅट करत बसतो तिथून फेसबुक.. तिथून इन्स्टा.. मग एक रील...पुढच रील पुढच रील...मग ते रहाटगाड चालूच..माहितीचे  लोटे मेंदूत रिकामे होत जातात..बिनकामाची माहिती मेंदूत साठत जाते..
       जगाशी सतत कनेक्ट रहायच हे व्यसन एकदम बेक्कार..मेंदू वेठबिगारी होतो..जेमतेम दहा बारा पान वाचलेलं पुस्तक तसंच पान  फडफडवत तिथेच पडून रहात.. केव्हातरी ते उचललं जातं.. बुक शेल्फ मध्ये  ठेवलं जातं..न वाचलेल्या पुस्तकांनी बुकशेल्फ भरून जाते..
       तुमचं अस कधी होत का?

-प्रशांत

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...