Ad

Wednesday 3 October 2018

आभाळमाया

आभाळमाया

अथांग आभाळाशी
एकदा बोललो मी
थांग तुझा का मज
लागत नाही....
उत्तरोनी आभाळ सांगे
काय सांगू बाळा मजसवे
बोलावयास कोणी नाही..

तुम्ही लेकरे या धरेची
ही धरा जरी माझी पत्नी असे
इतुकी गुंतली लेकरांत की
मजकडे तीचे लक्षच  नाही...
काय सांगू बाळा मजसवे
बोलावयास कोणी नाही..

जरी लेकरे आम्ही या धरेची
संकटात येते आठवण बापाची
तुझ्याकडेच हात पसरतो बापा
जाणतो तुझ्यात वसती देवाची
आनंदास मग आभाळाच्या
पारावार तो उरला नाही...
मेघांच्या सरी उतरल्या मग
धरतीच्या  गहिऱ्या डोही
.
.
.
.

थांग बापाच्या मनाचा
कोणालाच लागत नाही
बापाची आभाळमाया
कधी कोणालाच उमगत नाही

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846
  04/10/2018-©

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...