Ad

Monday 30 July 2018

कधी कधी बरे असते

कधी कधी बरे असते
फक्त फक्त शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

स्तुतीने ना कधी सुखावणे
अन टीकेची पर्वा करणे...
पथ काटेरी  वा हिरवळीचा
फक्त अन फक्त चालणे...
कधी कधी बरे असते
फक्त फक्त  शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

सोबतीला असो काफ़िला
असो एकटेच चालणे..
चालणे कित्येक मैल जरी
स्वप्न एका पावलाचेच पाहणे
कधी कधी बरे असते
फक्त शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

हे रोजचेच आहे आता
दशदिशांचे फितूर होणे..
अन गायब होत आहे..
चंद्राचेच चांदणे ...
म्हणूनच...
कधी कधी बरे असते
फक्त शून्य असणे....
उण्याची भीती अन
बेरजेची आस नसणे...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
  8600583846
  रत्नागिरी

No comments:

Post a Comment

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको..  सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हात...