Ad

Wednesday, 2 January 2019

अंधार

नाती तुटताना...
आवाज होत नाही...
आणि कोणी परकं होताना
कारण मात्र सांगत नाही..

ज्योत विझावी ना,
तशी नाती विझत जातात..
बघता बघता तुम्हालाच
बेदखल करून जातात

विझणारी ती विझून जाते
पण पापण्या भिजवून जाते
काळजात मात्र उरलेसुरले
प्रकाशकण ठेऊन जाते....

मग अंधारच बरा वाटतो
कारण तो खरा असतो
ज्योत विझून गेल्यावर
तोच एक सखा उरतो...

-प्रशांत श शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment

अनय

अनय.. लोक करतात राधे राधे  पण त्या अनयच काय  दुःख त्याचे मूक अनावर  कोण लक्षात घेत काय? सात फेरे आणि आहुती  त्यानेही दिली असेलना सुखी संसारा...