Ad

Monday 1 March 2021

ज्ञान-लेख

पुस्तके माहिती देतात, ज्ञान नाही. वाचन,चिंतन आणि मनन या ज्ञान प्राप्तीच्या पायऱ्या आहेत.पहिल्या पायरीशी थांबून चला आता ज्ञान झाले असे समजणे हे अज्ञान आहे.  
पुस्तक म्हणजे लेखकाला त्याच्या दृष्टिकोनातुन झालेले परिस्थितीचे आकलन असते.वाचक पुस्तक वाचताना लेखकाच्या भूमिकेत जाऊन जणू परकाया प्रवेश करत असतो. लेखकाला समजून घेण्यासाठी ते आवश्यकही आहे. परंतु एकदा का पुस्तक वाचून मिटून ठेवलं की त्या भूमिकेतुन बाहेर पडल पाहिजे.मग आपलं स्वतंत्र चिंतन सुरू केलं पाहिजे.चिंतन म्हणजे सेल्फ डिबेट असतो. जे काही वाचलं आहे त्याबद्दल स्वतःलाच उलटसुलट प्रश्न विचारता आले पाहिजेत. आणि असे मंथन झाल्यानंतर जे काही उरते त्याला ज्ञान म्हणतात.अर्थात असे ज्ञान तरी अंतिम असते का? तर याचे उत्तर नाही आहे.मिळालेले ज्ञान हे पुढचे ज्ञान मिळवण्यासाठीची पायरी असते.अशा अनंत पायऱ्या अनंत काळ चढाव्या लागतात. त्यामुळे ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेलाच विज्ञान म्हणावे का?
     बरं, वाचन म्हटलं की डोळ्यासमोर पुस्तकच येतात, ते तस नसतं, व्यक्ती,समाज परिस्थिती याचेही वाचन करता येते, पुस्तक म्हणजे  व्यक्ती, समाज यांच लेखकाला 
झालेले आकलन आणि त्याचा लिखित सत्यांश.
    केवळ पुस्तक वाचून ज्ञानी होता येते ही एक अंधश्रद्धा च आहे ,रूढार्थाने अशिक्षित बहिणाबाई यांच्या काव्यरचना विद्यापीठांचा अभ्यास विषय होतो यातच सर्व काही आलं..
    संग्रही पुस्तकं असणे म्हणजे शस्त्रसंपन्न असणे अशी उपमा दिली तर ती शस्त्रे प्रत्यक्ष किती वापरता येतात हे महत्वाचे..संग्रही पुलं ची पुस्तक भरपूर पण जगाकडे पाहण्याची जीवनदृष्टी हसरी ,खेळकर ,निरागस नसेल तर त्या  संग्रहाचा उपयोग काय.?  भगवद्गीता वाचली पण प्रत्यक्ष कर्मफळाची आशा सुटत नसेल तर काय उपयोग?
बायबल वाचले पण मन करुणेने भरून येत असेल तर काय उपयोग? बुद्धाची पुस्तके खूप आहेत संग्रही पण मनातून कोणाचा द्वेषच जात नसेल तर या संग्रहांचा उपयोग काय?
      माणूस जस जसे वाचत जातो तसा तो व्यापक होत जातो,हलका होत जातो, तो जर संकुचित  होत असेल तर तो केवळ पुस्तकांचा भरवाहक आहे..बाकी काही नाही

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment

कौशल्यम सर्वत्र पुज्यते

कौशल्यम सर्वत्र पुज्यते... ज्याचा मेंदू शाबूत तो प्रत्येक माणूस बुद्धिमान- मा.अविनाश धर्माधिकारी..     बुध्दीमत्तेविषयीच्या रूढ आणि पारंपरिक...