Ad

Thursday 30 May 2024

मनातलं..#-१

मनातलं..#-१

एकदा का एखाद्या माणसाचा हेतू लक्षात आला की त्याच्याशी प्रतिवाद करण्यात अर्थ नसतो..वैचारिक धारणा ,स्वमत बनण्याचे एक वय असते, ते उलटून गेले की माणसाचे मन एक मशीन बनते.. त्यातून एकसाची आऊटपुट बाहेर पडत रहातो.. तिथे वेगळी अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसतो..अशा एकसाची माणसांचा एक समूह बनतो,ते एकमेकांची पाठ थोपटत रहातात. एकमेकांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत बसतात.समूहाबाहेरील कोणी चुकून वेगळा व्यक्त झाला तर टोचून टोचून त्याला हैराण करतात..इनपुट तोच,प्रोसेस तीच त्यामुळे आउटपुट पण तोच..फार थोडी माणसं असतात की जी लहान मुलाच्या उत्सुकतेने जग पहातात..तटस्थ विचार करतात..त्यांच्या कपाळावर ना कोणता टिळा असतो ना त्यांच्या खांद्यावर  कोणता झेंडा असतो..त्यांची त्यांची जीवनसाधना ते करत असतात..आपल्या नकळत त्यांचा व्यष्टी ते समष्टी प्रवास चालू असतो ..त्यांच्यात कृष्णाचा कठोर कर्मसिद्धांत आणि बुद्धाची असीम करुणा एकाच वेळी वास करत असते. शाब्दिक कसरती न करता सम्यक कृती करून त्यांचे त्यांचे जीवन ते जगत असतात..पूर्वग्रह आणि अहंकार सोडला अशी माणसं दिसून येतात..अहंकाराचा सूर्य मावळल्याशिवाय निरामय शांतीचा चंद्रमा नजरेस पडत नाही...

😊 प्रशांत

Tuesday 28 May 2024

आई.

आई....

आई कुठे गेली?
तीच अस्तिव आहेच..
माझ्या धमन्यातून वाहतेय ती
माझ्या पेशींपेशीत रमलीय ती

आई कुठे गेली?
माझ्या ओल्या पापण्यात
ओथंबून येते ती आणि म्हणते
मी आहे रे..नको काळजी करू

आई कुठे गेली?
माझ्या जीन्स मध्ये
ती ओत:प्रोत भरून राहिलीय
माझ्यातच भरून राहीलय
तीच अपार्थिव अस्तित्व...

आई कुठे गेलीय ?
देहाच्या मर्यादा उल्लंघून
ती आता सोबतच असते
आताही आहे ..
 तिचा करूण स्निग्ध हात 
माझ्या पाठीवर फिरतोय..

आई कुठे गेली?
आई कुठे जाते का?
तिची नाळ अजूनही
पोसतेय माझा पिंड
तिच्या कुशीत 
पाय पोटाशी घेऊन
तिचे बाळ शांत निजले आहे
तिचे बाळ शांत निजले आहे

© प्रशांत
    8600583846

काटा रुते न कुणाला

काटा रुते न कुणाला...

माहितीचा अतिप्रचंड ओघ हे सामाजिक संवेदना बोथट होण्याचे एक कारण आहे, आयुष्य इतके गतीमान झालेय की एखाद्या घटनेवर व्यक्त व्हायला सुद्धा वेळ मिळत माही, निर्माण झालेली संवेदना टिकत नाही त्यामुळे त्यावर कृती करायला वेळ नाही. परस्परविरोधी माहिती इतकी येत असते की त्याची संगती लावताना मेंदू थकत जातो. पूर्वी सगळी सामाजिक अस्वस्थता चळवळीच्या रूपाने व्यक्त व्हायची.आता एखाद्या संवेदनशील प्रश्नावर  समक्ष एकत्र येण्यापेक्षा सोशल मिडियाद्वारे आपली अस्वस्थता व्यक्त करता येते.(ही पोस्ट पण त्याच वर्गात जाऊन बसण्याची शक्यता आहे) अर्थात हे वाळूत पाणी ओतण्यासारखे असते. अस्वस्थतेला मूर्त रूप येत नाही ती अमूर्त रहाते. एक रडका ईमोजी मी संवेदनशील असल्याचे सिद्ध करत असल्याने आणि तेवढंच सिद्ध करायचे असल्याने पुढे काही होत नाही.क्लीन इंडिया , लातूरच्या युवकांचे हरित लातूरचे स्वप्न  यासारख्या पोस्ट ना लाईक केले ,शेअर केले की पुढे प्रत्यक्ष कुदळ-फावडी घेऊन झाडे लावायची गरज वाटत नाही.तेच स्वच्छतेबाबत आहे.रस्त्यावर पडलेली प्लॅस्टिकची पिशवी उचलायला स्टेटस आडवे येते.आणि व्हाटसप चे स्टेटस मात्र स्वच्छता अभियानाचे असणार. सोशल मीडियावरची अस्वस्थता म्हणजे समुद्रात पडणारा पाऊस ..ना त्याचा शेतीला उपयोग ना तहान भागवणेसाठी...पाऊस पडला ना बस्स..
     कधी कधी वाटत की स्वातंत्र्य पूर्व काळात फेसबुक ,व्हाटसप असते तर महात्मा गांधींनी हॅशटॅग चलेजावं,हॅशटॅग असहकार अशा चळवळी चालवल्या असत्या का? व्हर्चुअल मीठ उचलून मिठाचा सत्याग्रह केला असता काय? मग सर्व नेटकऱ्यांनी me too  म्हणून साथ दिली असती काय?
     एकुणात मेंदू बधिर होत जातोय म्हणून की काय ए आय ची सपोर्टिंग सिस्टीम माणसाला विकसित करावी लागतेय?????

-@ प्रशांत शेलटकर - 8600583846

कोकनी..

कोकनी...😊 मी नाय भक्त आनी मी नाय चमचा खावन पिवन सुखी  भात आनी लोनचा हैसून येता पाकीट थैसून येता पाकीट टोपी खय कोनास ठाव उरला फक्त जाकीट हैस...