Ad

Saturday 28 September 2024

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या तरी अगम्य कर्माचे हिशेब नियती आपल्याकडून फेडून घेते.. पण त्याचे हिशेब आपल्याला देत नाही..अपूर्णतेची ठसठसती जखम प्रत्येकाच्या काळजाला देते नियती..प्रत्येकाची वेदना वेगळी..त्याची तीव्रता वेगळी..तथागत गौतम बुद्ध सांगून गेले की जग दुःखमय आहे कारण ते अपेक्षांच्या पायावर उभे आहे.. अपेक्षा सोडली तर दुःख होत नाही..गीतेत कृष्ण तेच सांगतो कर्म करीत रहा.. अपेक्षा करू नका..पण हे खूप कठीण असतं.. साधा कुणाचा पाय चुकून जरी लागला तरी आपल्याला समोरून सॉरी येणे अपेक्षित असते..मग संसार करताना किती प्रकारच्या अपेक्षा निर्माण होत असतील..?
      पण थिअरी काहीही असो..आपली दुःख आपणच समजू शकतो..इतरांच्या फुंकरी वेदना कमी करतात..पण जखमा बऱ्या करू शकत नाही..म्हणून मी कोणाला सल्ले देत नाही..आपण सगळेच शर शय्येवर पडलेले भीष्म आहोत..आणि तितकेच अगतिकही आहोत..शेवटी आनंदी असणे म्हणजे काय तर दुःख लपवण्याचे कौशल्य साध्य करणे..ते एकदा साध्य झाले आयुष्य सार्थकी लागते..

-© प्रशांत...

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...