Ad

Monday 2 January 2023

बखर

© प्रशांत शेलटकर यांची पोस्ट.

इतिहास जेवढा वाचाल तितके अधिक गोंधळात पडाल...एक पुस्तक वाचलं की बरोबर त्याच्या विरोधी विचाराचे दुसरे पुस्तक निघते.ते वाचले की त्याचे म्हणणे खोडून टाकणारे तिसरेच निघते. सत्य लपाछपी खेळत बसते. त्याचा शोध घेणे दमछाक ठरते. मग आपण थकतो.जे आपल्याला सोयीचे असतं, जे आवडत , ते आपण स्वीकारतो. द्विधा अवस्था माणसाला फार सोसत नाही. एक कळप तर पकडावाच लागतो.तो जे काही सांगतो तेच सत्य मानावे लागते.बघता बघता आपला झोंबी होतो. 
      तर्कनिष्ठ असणे सोपे नसते.इतिहास वाचताना तर ते जास्त गरजेचे असते. एखादी घटना जशी आहे तशी मांडणे बखरकाराना जमले असेल असे वाटत नाही. स्वतंत्र पणे बखर लेखन करणारे दुर्मिळ असावेत.राजाचे दरबारी बखरकार थोडेच तटस्थ लिहिणार? शिवाय त्या त्या बखरकारांची बौद्धिक क्षमता,आकलन क्षमता, त्यांचे पूर्वग्रह त्यांच्या लेखनावर परिणाम करणारच.मग त्यातल्या आपल्या मतांचे परिपोष होईल अशाच बखरकारांचे वाचन करून अर्वाचीन काळात पुस्तके लिहिणाऱ्या लेखकांचे लिखाण सत्याला धरून कितपत असेल. दुर्दैवाने ब्लॅक अँड व्हाइट पद्धतीने लिहिणारे लेखक आज लोकप्रिय होताना दिसत आहेत. आपल्या " मनातले "लिहिणारे लोकप्रिय होतात. मग असत्य वेगाने प्रस्थापित होते.
     
   इतिहास ही दुरून तटस्थपणे पहाण्याची ,अभ्यासण्याची गोष्ट आहे.फार जवळ गेलं तर झपाटते लांब गेलं की थोडी फार समजते. माणसाला आपल्या पूर्वसूरींशी इतकं का कनेक्ट रहाव वाटत हा परत मानसशास्त्राचा विषय...

- प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...