Ad

Monday 14 May 2018

निरोप

दिगंताच्या प्रवासा...
निघून असे जावे...
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

साथी आपले आपण
हेच एक सत्य....
प्रेम ही माया
जाणोनि हेच नित्य
मार्ग जिवनाचा
असाची क्रमावे
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

जिथे जीव लावावा
तोच जीव घेतो....
दर्द आयुष्याला
तोच तो देतो....
दुःख देणाऱ्यासही
सुख देतंच जावे...
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

कशाला कुणामध्ये
असे गुंतवून घ्यावे...
कशास स्वार्थास
नात्याचे नाव द्यावे
बंधनातून स्वतःच्याच
मोकळे स्वतःला करावे
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे

दिगंताच्या प्रवासा...
निघून असे जावे...
की कुणाच्या कधी
पाणी डोळा न यावे
-प्रशांत
8600583846

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...